स्त्रीवादाचे ध्येय स्त्री-पुरुष समानतेच्या अंतिमत्वाकडे वाटचाल करण्याचे असते.
पाश्चात्त्य स्त्रीवाद
जागतिक वाङ्मयात सॅण्ड्रा गिल्बर्ट, हेलन सिझू, एलेन शोवाल्टर, सिमाॅन दि बोव्हा आदी विदूषींनी स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मांडणी केली. वाङमयातील स्त्रीशरीरनिष्ठ अनुभव, मनोविश्लेषण, शब्दसंग्रह आदींचे चित्रण व छूपे पुरूषवर्चस्व यांचा शोध घेण्यावर स्त्रीवादी वाङ्मयाचा भर असतो.[१]
आधुनिकोत्तर (पोस्ट मॉडर्निझम)
उत्तर आधुनिकता
भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांची निखळ मैत्री, नैसर्गिक जैविक पातळीवरील पारंपरिकता, निरामय प्रेमसंबंध धारणेत अडथळे आहेत. असे समान पातळीवरचे स्त्री-पुरुष संबंध, प्रेमासारख्या अस्सल जिवंत, उत्कट संवेदना ठरावीक सत्तासंबंधाच्या प्रदूषित पर्यावरणामुळे अ-वास्तव ठरतात.
स्त्रीवादी वाङ्मय
बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३४ मध्ये दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. आपल्या सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा उपयोग करून घेतला. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रियांवर होणारे अन्याय या विरोधात त्यांनी समाजजागृती केली. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८४० मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून विधवाविवाहास अनुकूल असे पुस्तक लिहून घेतले होते.[ संदर्भ हवा ]
गोपाळ हरी देशमुख यांनी सुध्दा आपल्या शतपत्रांमधून स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. लोकहितवादी या नावाने १८४८ ते १८५० या दोन वर्षात त्यांची शतपत्रे प्रभाकर मासिकातून प्रसिद्ध झाली. पुरुषांना पुनर्विवाहाची परवानगी असेल, तर स्त्रियांनाही पुनर्विवाहाची परवानगी असली पाहिजे असे लोकहितवादींचे म्हणणे होते. त्यांनी विधवांच्या केशवपन करण्याच्या प्रथेवरही कडाडून टीका केली. काडीमोड करायचा झाल्यास तो पती-पत्नीच्या संमतीनेच झाला पाहिजे. पती जर पत्नीचा छळ करत असेल तर तिला पतीपासून विभक्त होता आले पाहिजे आणि अशा प्रकरणात तिला पोटगी मिळाली पाहिजे, असा विचार लोकहितवादींनी मांडला.
महादेव गोविंद रानडे हे सुधारक विचारवंतही स्त्री-पुरुषांच्या समान हक्कांचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्या काळी गाजलेल्या रखमाबाई विरुध्द दादाजी खटला ह्या खटल्यात कोर्टाने रखमाबाईने शिक्षा भोगावी किंवा स्वतःच्या मनाविरूध्द नव्या नवर्याकडे नांदावे असा पर्याय ठेवला होता. तेव्हा म.गो.रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभेत भाषण देऊन आपला पुरुषार्थ केवळ स्त्रियांशी वागतांनाच दाखवणाऱ्या पुरूषवर्गावर जोरदार टिका केली व स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार केला होता. विवाहयोग्य ठरण्याची मुलामुलींची किमान वयोमर्यादा कायद्याने ठरवली पाहिजे, सरकारी यंत्रणेने परवानगी दिल्यानंतरच विवाहविधी केले पाहिजेत, वृध्दांनी कुमारीकांशी विवाह करू नये अशी आग्रहाची मागणी करणारे विचार रानडे मांडलेले दिसून येतात.
गोपाळ गणेश आगरकरांनी १८८८ मध्ये सुधारक वर्तमानपत्र काढले. सुधारकात लिहिलेल्या स्वयंवर, विवाहनिराकरण(घटस्फोट), प्रियाराधना अशा निंबंधांमधून स्त्रीजीवनीसंबंधी सुधारणा आगरकरांनी सुचविल्या आहेत. त्यांनी बालविवाहाची चाल कायद्याने बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले. स्वयंवर पध्दतीनेच विवाह व्हावा असा त्यांचा आग्रह होता. स्त्री पुरुषांच्या समान स्वातंत्र्याची व समान संधींची मागणी आगरकरांनी केली होती.
या सर्व सुधारकांच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा जोतीराव फुले यांचे विचारकार्य स्त्रियांच्या आत्मसन्मानाला जागृत करणारे आणि तत्कालिन स्त्रीसाहित्याला प्रेरणा देणारे ठरलेले दिसून येते. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पत्ना सावित्रीबाई फुले यांना घरी शिकवून शिक्षिका बनवले. स्त्रीशिक्षण म्हणजे अनैतिकता व सामाजिक अनाचाराला निमंत्रण आहे. असा दांभिक तत्कालिन सनातनी वर्गाने केला. त्यांनी सावित्रीबाईंना दगड व शेण फेकून मारले. जोतीरावांच्या वडलांवर दडपण आणून त्यांनी जोतीबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यास भाग पाडले. पण जोतीरावांनी सर्व विरोधांवर मात करून मुलींसाठी आणखी शाळा काढल्या. शिक्षण मिळाल्याने कशी जागृती येते याचे प्रत्यंतर जोतीरावांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता नावाच्या मांग समाजाच्या मुलीने वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेल्या (इ.स.१८५५) एका निबंधातून मिळते. हा निबंध अहमदनगर येथून प्रकाशित होणा-य ज्ञानोदय पत्राने छापला होता. त्यात ती म्हणते, 'ब्राह्मण लोक म्हणतात, की इतर जातींनी वेद वाचू नयेत याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही. इंग्रजी राज्यापूर्वी उच्चवर्गातील लोकांचा अपराध केला असता महार व मांगांचे डोके मारीत असत. गुलटेकडीच्या बाजारात फिरण्याची मोकळीक नव्हती, ती आता मिळाली.' या देशातील स्त्रीमुक्तीचा हा पहिला उद्गार होता.
महात्मा फुले यांनी १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून मोठमोठाली पोस्टरे गावभर सर्वत्र लावली. अडचणीत सापडलेल्या विधवांनी तेथे यावे आपल्या मुलांना जन्म द्यावा. त्यांची नावे जाहीर होणार नाहित. जातांना त्यांनी मुल घेऊन जावे किंवा ठेऊन जावे. अनाथाश्रमात त्यांच्या मुलांचे संगोपन केले जाईल अशी सोय जोतीरावांनी केली होती.४ विधवांचे केशवपन होऊ नये म्हणून त्यांनी नाव्ह्यांचा संप घडवून आणला. लग्नाला अनेक वर्षे होऊनही त्यांना मुलबाळ नव्हते तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. पण जोतीरावांनी त्याला ठाम नकार दिला. स्त्रीला जर अपत्यप्राप्तीसाठी दुसरा नवरा करता येत नाही तर पुरुषाला तरी दुसरी पत्नी करण्याचा अधिकार का असावा? असा प्रश्न त्यांनी केला.५ या व अशा अनेक मूलभूत पातळीवरच्या सारासार विचारातून जोतीबी फुले यांनी स्त्री पुरूष समतेचा पुरस्कार केला. तत्कालिन स्त्रीलेखिका मागे उल्लेख आल्याप्रमाणे जरी फक्त उच्चवर्गातून आलेल्या व उच्चवर्गातील स्त्रियांचे प्रश्न मांडणाऱ्या होत्या तरीसुध्दा त्यांनाही आप्तस्वकीयांच्याच प्रखर रोषाला सामोरे जावे लागले. या स्त्रीवादी साहित्याच्या पहिल्या हूंकाराच्या पाठीशी आपल्या विचाराचे पाठबळ समर्थपणे उभे करण्याचे महत्त्वाचे कार्य जोतीबांनी केले. ॓विख्यात विदूषी पंडीता रमाबाईंना मराठी पत्रकर्त्यांनी दिलेली दुषणे खोडून टाकण्यासाठी, तसेच बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या स्त्री पुरूष तुलना नामक पुस्तकावरील ॓पुरुषी॔ पुर्वग्रहदुषित टिका परतून लावण्यासाठी ॓सत्सार॔या आपल्या अनियतकालिकाचा विशेष अंक जोतीरावांनी काढला आणि संवादरूपाने त्यांनी त्यातून स्त्रीमुक्तीचा संदेश सांगितला सारांशाने १८८५ ते १९५० या काळात मराठी वाङ्मयात लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी साहित्याची प्रमुख प्रेरणा म्हणून जोतीबा फुले यांच्या विचारकार्याचा मोठा वाटा आहे.
महात्मा जोतीबा फुले यांच्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरूवातीला महात्मा गांधी यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाची ठेवलेली जाणीव ही या काळातील स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा म्हणून निर्देशित करावी लागेल. आॅल इंडीया वुमेन्स काॅन्फरन्सला पाठविलेल्या आपल्या संदेशात महात्मा गांधी म्हणतात, ॓जिला आपण अबला म्हणतो ती स्त्री ज्या क्षणी सबला होईल त्या क्षणी जे कोणी असहाय आहेत ते सर्व शक्तिमान होतील.॔७ गांधीजींनी या विचारधारेला अनुसरूनच स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसबलीकरणाचा पुरस्कार केला. विनोबा भावे, महर्षी कर्वे यांनीही स्त्रीमुक्तीचा पुरस्कार केला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रीला हिंदू पुरुषाच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून ॓हिंदू कोड बील॔ तयार केले होते. या बीलाचा आग्रह नाकारल्या गेल्याने त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दलित स्त्रियांनी आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. डाॅ. धोंडो केशव कर्वे यांनी एका विधवेबरोबर विवाह केला आणि तिला स्त्रीशिक्षणाच्या कार्यात सहभागी करून घेतले. १९०६ साली त्यांनी महिला महाविद्यालय सुरू केले. १९१६ साली महिलांसाठी महिलांसाठी भारतवर्षीय महिला विद्यापीठ सुरू केले.
महात्मा फुले यांच्यानंतर स्त्रीवादी साहित्याला प्रेरणा ठरणारे विचारकार्य करणाऱ्यांमध्या विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता. आपल्या व्याख्यानांमधून, वेळोवेळी केलेल्या लिखाणांमधून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एकंदरीत मानवी विकासक्रमात स्त्रीचे असलेले महत्त्वाचे स्थान त्यांनी अतिशय सखोल अशा चिंतनातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यामध्ये मानवी जगाच्या इतिहासाच्या आरंभी घरात व समाजातही स्त्रीला अधिकाराचे राज्य होते. त्या काळी स्त्रीसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. त्या काळात स्त्रीजवळ आजच्या प्रमाणे असलेल्या भावनांसोबतच उपजत बुध्दी, विवेचक बुध्दी व प्रयत्नशक्ती असली पाहिजे. नंतरच्या काळात घडत गेलेल्या सामाजिक स्थित्यंतरांमुळे स्त्रीसत्ताक पध्दती लयास जाऊन पुरूषवर्चस्व निर्माण झाले. आणि पुरूषप्रधानतेमुळे स्त्रीच्या ठायी विवेचक बूध्दीचे आणि प्रयत्नसामर्थ्याचे खच्चीकरण होऊन स्त्रियांनी पुरूषांपूढे गौणत्व स्वीकारले असावे. असे असले तरी फक्त पाळण्याचीच नव्हे तर घरगुती राज्याची दोरी स्त्रीच्याच हाती आहे. स्त्रीला केवळ शिष्टाचारयुक्त वागण्यात मान दिल्याने स्त्रीला समानतेने वागवले असा त्याचा अर्थ होत नाही. स्त्रीच्या विवेचक बुध्दीत म्हणजेच विचारशक्तीत वाढ घडवून सामाजिक जडणघडणीत तिला क्रियाशील बनवायचे असेल तर तिला खरेखुरे स्वातंत्र्य द्यायला हवे असे आग्रहाचे प्रतिपादन वि.रा. शिंदे यांनी केले.
१९२० मध्ये मुंबई इलाख्यातील निवडणूक लढवितांना शिंदे यांनी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिनाम्यात विद्याबळ, द्रव्यबळ व अधिकारबळ नसलेल्या व म्हणून मागास राहिलेल्या वर्गामध्ये त्यांनी स्त्रीवर्गाचा समावेश केला. स्त्रीवर्गाच्या हिताची कळकळ व स्त्रीवर्गाचे महत्त्व नमूद करतांना त्यांनी जाहिरनाम्यात म्हटले आहे, की ॓चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहिच लागले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणारांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे? स्त्री वर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्याची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही पूर्णपणे जाणून आहो.॔८
सारांशाने इंग्रजी राजवटीमूळे झालेली आधुनिक जाणीव, शिक्षणाने व नव्या विचाराने जागृत झालेला आत्मसन्मान आणि वरील सर्व समाजसुधारकांच्या विचारकार्याच्या पाठबळाने स्त्रियांच्या व पुरुषांच्याही स्त्रीवादी लेखनाला चालना मिळाली. रमाबाई रानडे, पार्वतीबाई आठवले, लक्ष्मीबाई टिळक, संजीवनी मराठे, शांता अापटे, आनंदीबाई कर्वे, लिलाबाई पटवर्धन, अन्नपूर्णाबाई रानडे, इंदिरा भागवत आदी स्त्रियांनी प्रामुख्याने आत्मचरित्र, कथा व स्फुट लेखनातून स्त्रियांचे भावविश्व उलगडले. स्त्रीवादी विचाराचे लेखन करण्यात सुधारक विचारवंत पुरूषांनी जे धाडस दाखवले ते धाडस दाखवणे साहित्यिक वर्तुळातल्या पुरुषांना मात्र अपवादानेच जमल्याचे आढळून येते. गाे.ब.देवल (संगीतशारदा), प्र.के.अत्रे (घराबाहेर), कृ.प.खाडीलकर(मेनका) अशा काही नाटककारांनी स्त्रीवादी विचारांची नाटयरचना केली. ॓कृ.प.खाडीलकर यांच्या मेनका या नाटकात स्त्रीच्या मातृत्वाच्या हक्काचा प्रश्न चर्चिला गेला आहे. पण खाडीलकर स्त्रीच्या मातृत्वाच्या अधिकाराची मांडणी देशकार्याच्या पूर्तीच्या उद्दीष्टांशी जोडून करतात.९
पुरूष समाजसुधारक आणि पूरोगामी साहित्यिक यांचा स्त्रियांच्या प्रश्नावर लढा सुरू असतांनाच स्त्रियांनीही आपल्या प्रश्नांवर लेखन करण्यास सुरूवात केली. शिक्षणामुळे आलेले आत्मभान आणि याच काळात महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीत घेतलेला स्त्रियांचा सहभाग यातून स्त्री लेखिकांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला. स्त्रियांनी कथालेखनाच्या माध्यमातून आपल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त केले. स्त्रियांनी आत्मचरीत्र हा प्रकारही विपूल प्रमाणात हाताळला. स्त्रियांनी लिहिलेल्या आरंभीच्या आत्मचरीत्रांमध्ये पारंपरिक स्वरुपाचेच विचार मांडलेले दिसून येतात. हौस म्हणून किंवा दुःख विसरण्याचा मार्ग म्हणून बहूतांशी उच्चमध्यम वर्गातील स्त्रियांनी ही आत्मचरीत्रे लिहिली.
ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्रीपूरूषतुलना या पुस्तिकेतील लिखाणातून काळाच्या मानाने अतिशय परखडपणे आपले विचार व्यक्त केले. ताराबाई शिंदे यांनी स्त्रीचे विविध स्तरावर होणारे शोषण, पुरुषसंस्कृतीची वर्चस्व राखण्याची रानटी वृत्ती यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रहार केले. ॓नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानुन कोण बरे वागेल ?॔ असा सवाल ताराबाई शिंदे यांनी आपल्या लेखनातून केला आहे.१० १९५० पर्यंतच्या मराठी वाङ्मयात स्त्रीवादी विचारांची पात्रे परखडपणे चित्रीत करण्याचे धाडस विभावरी शिरुरकर यांनी सर्वप्रथम केले. विभावरी शिरुरकर यांचा ॓कळ्यांचे निःश्वास॔ हा कथासंग्रह प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्य लेखनाला स्त्रीचे खरे सत्त्व सापडलेले आढळून येते. ॓कळ्यांचे निःश्वास॔ कथासंग्रहातील ॓हिंदोळ्यावर॔ या कादंबरीतील नायिका या व्यक्तीस्वातंत्र्याच्या प्रखर जाणीवांचा आविष्कार करतात. ॓व्यक्तीस्वातंत्र्य + वास्तववाद अशा प्रेरणा एकत्रीत जागृत होऊन विभावरीबाई स्त्रीविश्वाचे खरेखुरे दर्शन घडविण्याकडे वळल्या.११ विभावरींचे हे लेखन पुढे जागतिक वाङ्मयाच्या प्रेरणेतून १९६० नंतर मराठी वाङ्मयात उदयास आलेल्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहाच्या प्रेरणांमध्ये विभावरींच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
१९६० नंतर जागतिक वाङ्मयात स्त्रीवादी साहित्यविचाराने जोर धरला. मराठीतही त्यामानाने बऱ्याच लवकर साधारणतः १९७० च्या दशकात जागतिक स्त्रीवादी वाङ्मयविचाराने प्रेरीत होऊन स्त्रीवादी लेखन होऊ लागले. भारतीय समाजसुधारक, १९५० पर्यंतचे विभावरी शिरूरकर, ताराबाई शिंदे आदींचे लेखन व विचारकार्य आधुनिक युगाचा मूळधर्म ठरलेला वास्तववाद, मार्क्सवादी विचारधारा, दलित साहित्याची चळवळ, साक्षरता मोहीम, स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण अशा अनेक विचार व घटनाक्रमांच्या प्रेरणेने मराठी वाङ्मयात नवा स्त्रीवाद अवतरला.[१]
१८८५ ते १९५० या काळातील स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा ताराबाई शिंदे १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना‘ या निबंध हे महाराष्ट्रातील पहिले स्त्रिवादी लेखन म्हणून गणले जाते.स्त्रीवादी साहित्य हे भारतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक साहित्याच्या बरोबरीनेच उदयास आलेले आहे. या स्त्रीवादी लिखाणाच्या प्रेरणास्थानी मात्र जगातील स्त्रीवादी विचार होता असे म्हणता येत नाही. या काळात लोकहितवादी, न्या.रानडे, म. फुले, आदींनी केलेले स्त्रीवादी लिखाण हे भारतीय संस्कृतीतील अन्यायी पुरुषप्रधानतेच्या अनुषंगाने केलेले होते.
सतीच्या चालीविरुध्द आंदोलन करणारे राजाराम मोहनराॅय हे पहिले कृतीशिल स्त्रीवादी विचारवंत म्हणून पुढे आले. सती प्रथेबरोबरच स्त्रियांवर होणाऱ्या सर्वच प्रकारच्या अन्यायाविरुध्द त्यांनी आंदोलन छेडले. मृत पतीच्या मालमत्तेत मुलांसोबत पत्नीलाही वाटा मिळाला पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. त्यांनी विधवाविवाहाचा पुरस्कार केला. समाजातील स्त्रियांची गुलामी ही पुरूषांच्या अहंकारामुळे निर्माण झालेली असून जोपर्यंत त्या शिक्षण घेत नाहित तोपर्यंत ही गुलामी नष्ट होणार नाही. असे विचार राजाराम मोहनराॅय यांनी मांडले.
जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली प्रेरणा १९६० नंतर मराठीत जे स्त्रीवादी लिखाण झाले त्याची प्रेरणा मात्र भारतीय संस्कृतीला विरोध करण्यातून व त्याचबरोबर जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्यचळवळीतून मिळालेली दिसून येते. म्हणजेच स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणांचा विचार हा १९६० नंतरच्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा व अशा दोन अंगांनी या ठिकाणी करणे आवश्यक ठरते.
स्त्रीवादी लेखन जरी १९४० ते १९५० च्या दशकांदरम्यान होऊ लागले तरी स्त्रीवादाची तात्त्विक बैठक ही मात्र १९७० च्या दशकाच्या आसपास मराठी वाङ्मयात स्विकारली जाऊ लागली.
No comments:
Post a Comment